आधुनिक भारताचा इतिहास | Modern Indian History Part V

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

मद्रास प्रांतातील क्रांतिकारी चळवळ:

मद्रास प्रांतात सुब्रमण्यम शिव, चितंबरम पिलाई, तिरूमल आचार्य, व्ही. व्ही. एस. अय्यर, वांची अय्यर या क्रांतिकारकांनी ब्रिटीशांविरोधात चळवळ उभारली.

तिरूमल आचार्य व व्ही. व्ही. एस. अय्यर हे क्रांतिकारक लंडनमधील इंडिया हाऊसशी संबंधित.

बंगालमधील क्रांतिकारी चळवळ:

युगांतर 1906: योगी अरविंदांचे बंधु बरिन्द्रकुमार घोष आणि स्वामी विवेकानंदांचे बंधु भुपेंद्रनाथ दत्त या नेत्यांनी युगांतर समितीची स्थापना करून ‘युगांतर’ हे क्रांतीचा प्रचार करणारे वृत्तपत्र सुरू केले.

अनुशीलन समिती (1901): बरिंद्रकुमार घोष व भूपेंद्र दत्त यांच्या पुढाकाराने क्रांतिकारकांनी स्थापन केलेल्या अनुशीलन समितीच्या बंगालभर 500 शाखा सुरू केल्या.

हेमचंद्र दास, उल्हासकर दत्त, खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी, हे क्रांतिकारक अनुशीलन समितीचे सदस्य होते.

हेमचंद्र दास याने रशियात जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.

क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी अरविंद घोष यांनी ‘वंदे मातरम’ तर बिपिनचंद्र पाल यांनी ‘न्यू इंडिया’ ही वृत्तपत्रे सुरू केली. 

माणिकतोळा प्रकरण: कोलकातामधील माणिकतोळा येथे बॉम्ब निर्मिती कारखान्याचा सुगावा लागल्याने ब्रिटीशांनी अरविंद घोष, बरीन्द्र घोष, उल्हास दत्त, हेमचंद्र दास आदि अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांवर खटला भरला.

या खटल्यात कन्हैयालाल दत्त व एस. एन. बोस आदि अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांवर खटला भरला व त्यांना फाशी देण्यात आली. इतर 36 जणांवर कठोर शिक्षा करण्यात आली.

हा खटला ‘माणिकतोळा कट’ म्हणून प्रसिद्ध.

रासबिहारी बोस: यांनी डिसें. 1912 मध्ये लॉर्ड हर्डिंग्जवर दिल्ली या नव्या राजधानीत प्रवेश करताना चाँदनी चौकात बॉम्ब फेकला. यात हर्डिंग्ज बचावला.

हा खटला दिल्ली कट खटला म्हणून प्रसिद्ध

1915 चा फसलेला उठाव: 21 फेब्रुवारी 1915 रोजी रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल, विष्णु गणेश पिंगळे, बागी कर्तारसिंग यांनी ‘गदर’ या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचे ठरवले होते.

किरपालसिंग’ या घरच्या भेद्याने सरकारला माहिती दिल्याने कट फसला.

जपानमध्ये रासबिहारींनी ‘इंडियन नॅशनल आर्मी’ ची स्थापना केली.

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त

17 डिसेंबर 1928: लाला लजपतराय यांच्यावर लाठीमार करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जुलमी इंग्रज अधिकारी सांडर्स व त्याचा सहकारी आयर्स्ट यांची भगतसिंग व राजगुरू यांनी हत्या केली.

8 एप्रिल 1929- दडपशाहीचे ‘पब्लिक सेफ्टी बिल’ सरकारने मंजूर केले. याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळात बॉम्बस्फोट केले.

23 मार्च 1931 भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना लाहोर येथे फाशी देण्यात आली. (24 मार्च या नियोजित तारखेच्या आधी)

चंद्रशेखर आझाद, यशपाल सिंग

चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ ची स्थापना सकरण्यात आली. यामध्ये भगतसिंग, यशपालसिंग, सुरेन्द्र पांडे यांचा समावेश.

आझादानी भागतसिंगांची शिक्षा जन्मठेपेपर्यंत कमी करण्यासाठीचे प्रयत्न फसल्याने दिल्ली येथे आयर्विन यांची रेल्वे उलथून टाकली. आयर्विन बचावला.

27 फेब्रुवारी 1931: अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्क येथे आझादानी स्वतःवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर नेतृत्व यशपालसिंहांकडे.

क्रांतिकारकांचे परदेशातील कार्य

शामजी: रॅंड हत्याप्रकरणी शामजी कृष्ण वर्मा यांचा हात असावा असा सरकारने संशय घेतल्याने त्यांनी इंग्लंडला प्रयाण केले. तेथे ‘इंडिया हाऊसची’ स्थापना केली.

शिवाजी शिष्यवृत्ती: भारतातील राष्ट्रवादी तरुणांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शामजींनी ही शिष्यवृत्ती जाहीर केली होती. तिच्या मदतीने सावरकर इंग्लंडला गेले.

The Indian Socialogist – हे वृत्तपत्र इंग्लंडमध्ये सुरू करून वर्माजींनी भारतीयांवरील अन्यायाची वाचा फोडली.

तलवार व इंडियन फ्रिडम यांसारख्या क्रांतिकारी पत्रांच्या संपादनास सरदारसिंग राणा यांनी शामजी वर्मांना सहाय्य केले. 1907 मध्ये जर्मनीतील स्टूटगार्डमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मादाम कामा यांनी हिंदुस्तानचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकावला.

मदनलाल धिंग्रा: मूळ पंजाबचे. इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट. 1 जुलै 1909 कर्झन वायलीची हत्या केली.

17 ऑगस्ट 1909 – धिंग्रा यांना फाशी.

कामागाटामारू: सप्टेंबर 1914 मध्ये बाबा गुरुदीतसिंग या भारतीय ग्राहस्ताने कामागाटामारू हे जपानी जहाज भाड्याने घेऊन कलकत्ता ते कॅनडा प्रवास केला. कॅनडियन सरकारने जहाजास परत पाठवले. कोलकात्यास हे जहाज परतताच त्यातील लोकांवर गोळीबार झाला.

लाला हरदयाळ: यांनी 1913 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी सुरू केलेले गदर हे मुखपत्र मराठी, इंग्रजी, हिन्दी, बंगाली अशा विविध भाषांमधून प्रकाशित होई. (1911)

परदेशातील भारतीयांमध्ये पारतंत्र्याविरुद्धाची भावना चेतावण्याचे कार्य.

काकोरी कट – 9 ऑगस्ट 1925

क्रांतीकार्याला लागणारा पैसा जमविण्यासाठी त्यांनी रेल्वेतून जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशनजवळ लुटला.

या कटात चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल, अशफाकउल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र लाहीरी आदि क्रांतिकारकांचा समावेश होता.

अशफाकउल्ला खान हा फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक.

मीरत कट (1929)

1925 मध्ये श्रीपाद डांगे, जोगळेकर आदींनी साम्यवादी पक्षाची स्थापना केली.

20 मार्च 1929 सरकारने या नेत्यांना अटक केली.

हा खटला मीरत येथे चालल्याने तो ‘मीरत कट’ नावाने प्रसिद्ध आहे.

चितगाव कट (18 एप्रिल 1930) स्त्रियांचा विशेष सहभाग

18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी बंगालमधील चितगाव पोलीस शास्त्रगारावर हल्ला करून शस्त्रे लुटली. यामध्ये सूर्य सेन यांच्या नेतृत्वाखाली अनंत सिंग, गणेश घोष, तारकेश्वर दस्तीदार, अजय घोष यांच्याशिवाय कल्पना दत्त, प्रीतीलत्ता वड्डेदार, अंबिका चक्रवर्ती आदि महिलांचा समावेश होता.

शांती घोष व सुनीती चौधरी या शाळकरी मुलींनी केमिल्लाच्या जिल्हा न्यायाधीशाचा वध केला. बींना दास या युवतीने कोलकता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

राष्ट्रीय संग्रामातील अन्य चळवळी

नोव्हेंबर 1921: पुण्यात वामनराव पटवर्धन यांच्या पुढाकाराने ‘अखिल भोर संस्थान प्रजा सभा’ स्थापन झाली.

वंदे मातरम आंदोलनात आघाडीवर असलेले गोविंदभाई श्रोफ यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

बंगाली साहित्यिक ‘दीनबंधुमित्र’ यांच्या ‘नीलदर्पण’ या नाटकाद्वारे नीळउत्पादक शेतकर्‍यांच्या हलाखीचे दर्शन समाजास घडविले.

1918 बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने उत्तर परदेशात ‘किसान सभा’ स्थापन.

1921-केरळमध्ये मोपला शेतकर्‍यांनी मोठा उठाव केला. सरकारने हा उठाव दडपताना दहा हजार मोपला ठार केले.

आखील भारतीय किसान सभा (1936): प्रा. एन. जी. रंगा यांच्या प्रयत्नातून ही सभा स्थापन.

स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते.

कामगार चळवळी

1884-नारायण मेघोजी लोखंडे यांनी मुंबईत मिल हँड असोसिएशन ही भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन केली.

1918 बी. पी. वाडिया व रामानुज नायडू यांनी ‘मद्रास लेबर युनियन’ ही कामगार संघटना स्थापन केली.

31 ऑक्टोबर 1920: ऑल इंडिया ट्रेड युंनियन कॉंग्रेसची’ AITUC ची स्थापना.

कामगार नेते ना. म. जोशी यांचा या स्थापनेत पुढाकार होता.

पुढील काळात AITUC-आयटक मध्ये फूट पडली. 1931 साली ‘अ. भा. लाल ट्रेड युंनियन कॉंग्रेस’ तर 1938 मध्ये ‘राष्ट्रीय कामगार संघटना संघाची’ स्थापना.

1929 – ना. म. जोशी यांनी ‘ऑल इंडिया ट्रेड युंनियन फेडरेशनची’ स्थापना.

समाजवादी चळवळ-1934

यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मिनू मसानी, राममोहन लोहिया, आदि नेत्यांचा समावेश होता.

दलितांची चळवळ

विटाळ विध्वंसन’ या पुस्तकातून वलंगकर यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले.

1910: तामिळनाडूत ‘नाडरमहाजन संघ’ ही दलितोद्धारासाठी स्थापना झाली.

1915 : दक्षिणेत  सी. एन. मुदलीयार, टी. एन. नायर, त्यागराज चेट्टी यांनी जस्टीस आंदोलन चालू केले.

1916 : या आंदोलनाचे रूपांतर ‘जस्टिस पक्षात’ झाले.

मुस्लिम लीगची स्थापना: 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका येथे.

लॉर्ड मिंटो यांच्या वरदहस्ताने 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना.

लीगच्या संस्थापकांमध्ये आगाखान हे धर्मगुरू, मोहसीन-उल-मुल्क, नवाब सलीमुल्ला आदि.

लखनौ करार 1916: 1916 च्या लखनौ अधिवेशनात राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात तडजोड होऊन लखनौ करार अस्तित्वात आला. या करारानुसार मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली.

पाकिस्तानची मागणी: 1930 साली डॉ. महमद इक्बाल याने मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला.

रहमत अली चौधरी याने आपल्या ‘नाऊ ऑर नेवर’ या पुस्तकात या स्वतंत्र राष्ट्रास पाकिस्तान असे संबोधण्यात यावे असे सुचवले.

अहमद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली.

हिंदू महासभा 1915: पंडित मदनमोहन मालवीय यांनी हिंदू महासभेची स्थापना केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925: डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे या संघाची स्थापना केली.

साम्यवादी पक्ष (Communist party) : 1920 मानवेन्द्रनाथ रॉय यांनी हा पक्ष स्थापन केला.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us