आधुनिक भारताचा इतिहास | Modern Indian History Part III

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल | Indian National Congress

अॅलन ह्युम यांनी 1884 साली स्थापना केलेल्या ‘इंडियन नॅशनल यूनियन’ या संस्थेचे रूपांतर 1885 मध्ये ‘भारतीय राष्ट्रीय सभेत’ झाले. अॅलन ऑक्टोव्हियन उर्फ ए. ओ. ह्युम या निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकार्‍याने 28 डिसेंबर 1885 साली स्थापना केली. (व्हाईसरॉय-लॉर्ड डफरीन). राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे प्रस्तावित होते. कॉलर्‍याची साथ जोरात पसरल्याने 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात पहिले अधिवेशन पार पडले.

राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन : मुंबई येथे 28 ते 31 डिसेंबर 1885

सर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

देशभरातून 72 प्रतिंनिधी होते यात 54 हिंदू, 2 मुस्लिम

  1. मवाळ कालखंड 1885-1905 (राष्ट्रीय सभेची अधिवेशने झाली)
  2. जहाल कालखंड 1905-1920 (17 अधिवेशने)
  3. गांधी युग 1920-1947

राष्ट्रसभेचा  मवाळ कालखंड:

  • सभेच्या स्थापनेपासून बंगालच्या फाळणीपर्यंत
  • दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्या. तेलंग, रंगय्या नायडू, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, न्या. रानडे, दिनशा वाच्छा, बदरुद्दीन तय्यबाजी.
  • 1890-राष्ट्रीय सभेच्या समितीची स्थापना. (सदस्य जॉर्ज युल, अॅलन ह्युम, होर्वर्ड, नॉर्टन, अॅडम्स इ.)

पितामह दादाभाई नौरोजी (1825 ते 1917)

  • भारताचे पितामह
  • जन्म: 4 सप्टेंबर 1825, नवसारी (गुजरात) फारशी कुटुंबात
  • 1852-भारतीयावरील अन्यायास वाचा फोडण्यासाठी ‘बॉम्बे असोसिएशन’ च्या स्थापनेत पुढाकार
  • 1853- मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक (गणित)
  • 1861- ‘रास्त गोफ्तार’ (खरी बातमी) हे साप्ताहिक सुरू केले.
  • 1886,1893,1906 – असे तीन वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्ष पद भूषवले.
  • 1873: लुटीचा सिद्धांत मांडला (Drain Theory).
  • 1892-95: इंग्लंडमधील ‘फिन्सबरी’ मतदारसंघातून निवडून येऊन ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ चे सभासद बनले. दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिन्दी सभासद.
  • 1887: इंग्लंडमध्ये ‘इंडियन रिफोर्म्स असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली.
  • मृत्यू : 30 जून 1917 (मुंबई)
  • Poverty and Unbritish Rule in India – या ग्रंथात ‘लुटीचा सिद्धांत’ मांडला.
  • दादाभाईंना ‘भारतीय अर्थशास्त्राचे जनक’ म्हणतात.

न्या. महादेव गोविंद रानडे (1842-1901)

  • जन्म-18 जाने. 1842 निफाड येथे.
  • 1865-पुण्यात विधवाविवाहोत्तेजक मंडळाच्या स्थापनेत सहभाग.
  • 1867-प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार.
  • 1870-सार्वजनिक सभेच्या स्थापनेत पुढाकार.
  • 1887-भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना.
  • 1890-देशाने उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात प्रगती करावी म्हणून पुणे येथे ‘भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना.
  • समाजात वाङ्मयाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून पुणे येथे ‘ग्रंथोत्तेजक सभा’ स्थापन केली.
  • निधन 16 जाने 1901.
  • ‘थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जीवंत करण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले.’ असे लोकमान्य टिळक म्हणतात.
महादेव गोविंद रानडे यांची ग्रंथसंपदा:
  • ‘मराठी सत्तेचा उदय’ ‘Rise of Maratha Power.’
  • ‘एकेश्वरनिष्ठांची कैफियत’ ‘Theists Dairy of Confessio’ हा निबंध प्रार्थना समाजाच्या प्रचारार्थ लिहिला.
  • ‘Essays on Indian Economics’ हा अर्थशास्त्रावरील निबंध.

सर फिरोजशाह मेरवानजी मेहता (1845-1915)

  • पारशी समाजाचे नेते
  • मुंबईचा सिंह’ म्हणून लौकिक
  • जन्म 4 ऑगस्ट 1845 मुंबई
  • 1866-मुंबई विद्यापीठातून MA बनणारे पहिले फारशी समाजाचे विद्यार्थी
  • ‘भारतातील सर्वोत्तम वादपटू’ म्हणून लौकिक.
  • 1885-बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष
  • 1904-ब्रिटिश पार्लमेंटने ‘नाइट कमांडर’ हा (Night Commander) हा किताब दिला.
  • 1910-फिरोजशाह यांनी जे. बी. पेटीट यांच्या सहाय्याने ‘बॉम्बे क्रोनिकल’ हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले.
  • निधन : 5 नोव्हेंबर 1915 मुंबई.

नामदार गोपाळकृष्ण गोखले

  • जन्म 9 मे 1866 कातलूग (जि. रत्नागिरी)
  • 1905-भारत सेवक समाजाची स्थापना
  • उधिष्ट: ‘साम्राज्यांतर्गत स्वराज्य आणि देशबांधवांची उन्नती.’
  • गांधीजी गोखलेंना आपले राजकीय गुरु मानत.
  • निधन: 19 फेब्रुवारी 1915
  • ‘The Diamond of India and Jewel of Maharashtra’-लो. टिळक

राष्ट्रसभेचा जहाल कालखंड (1905-1920) (टिळक युग)

1905 मध्ये जपान या छोट्या आशियाई राष्ट्राने रशिया या बड्या पाश्चात्य राष्ट्राचा पराभव केला. ही घटना भारतीयांना प्रेरणादायी ठरली. 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली यातून मवाळ-जहाल मतभेद वाढला. 1907 च्या सूरत अधिवेशनात जहालांनी मवाळांपासून फारकत घेतली.

प्रमुख जहाल नेते: लो. टिळक, पंजाब केसरी लाला लाजपतराय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष इत्यादि.

बंगालची फाळणी:

7 जुलै 1905 रोजी सिमला येथून बंगालच्या फाळणीची योजना घोषित केली. 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अमलात आणली आणि बंगालमध्ये आंदोलनास सुरुवात झाली.

वंगभंग आंदोलन: 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने ‘दुखवटा दिन’ म्हणून पाळला.

बंकिमचंद्रांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील ‘वंदे मातरम’ हे गीत आंदोलकांच्या परवलीचा शब्द बनले.

डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा औषधांचा स्वदेशी कारखाना काढला.

लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी ‘स्वराज, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण’ हा चतुसूत्री कार्यक्रम भारतीयांना दिला.

अशा प्रकारे वंगभंगविरोधी आंदोलन राष्ट्राव्यापी बनल्याने 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हर्डिंग्जने भरविलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली.

1905 चे बनारस अधिवेशन – अध्यक्ष नामदार गोपाळकृष्ण गोखले

1906 चे कोलकाता अधिवेशन: अध्यक्ष दादाभाई नौरोजी

दादाभाईनी अध्यक्षीय भाषणात ‘चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा.’ हा संदेश दिला.

चतुसूत्रीस मान्यता

1907 चे सूरत अधिवेशन: अध्यक्ष- डॉ. रासबिहारी बोस

सभेच्या कार्यक्रमपत्रिकेतून ‘बहिष्कार’ व ‘राष्ट्रीय शिक्षण’ हे शब्द वगळल्याने जहाल नाराज झाले.

जहालाना अध्यक्षपदी लाला लाजपतराय हवे होते, परंतु मवाळांनी डॉ. बोस यांना अध्यक्ष बनवले.

टिळक युग:

  • जन्म- 23 जुलै 1856 रत्नागिरी येथील टिळक आळी येथे.
  • 1871 – तापीबाई (सत्यभामाबाई) यांच्याशी विवाह.
  • 1 जाने. 1880 पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना.
  • 1881- केसरी (मराठी) व मराठा (इंग्रजी) ही वर्तमानपत्रे सुरू केली.
  • 1884- डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
  • 1885-फर्ग्युसन कॉलेजची स्थापना.
  • 1893-साली गणेशोत्सव व 1895 साली शिवजयंती ची सुरुवात.
  • 1895-टिळकांनी सार्वजनिक सभेवर पकड मिळवून रानडे यांची हकालपट्टी केली.
  • 1896 ला रानडेंनी ‘डेक्कन सभा’ स्थापन केली.
  • ब्रम्हदेशात मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
होमरूल चळवळ: (होमरूल म्हणजे स्वशासन)

आयरीष विदुषी डॉ. अँनी बेझंट यांनी 1915 साली मद्रास प्रांतातील अडयार येथे होमरूल लीग ची स्थापना केली.

आयर्लंडच्या होमरूलच्या धर्तीवर 1916 साली महाराष्ट्रात टिळकांनी होमरूल चळवळ सुरू केली.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा बेळगाव येथे दिली.

या घोषणेचे जनक टिळकांचे सहकारी जोसेफ बॅप्टिस्टा हे होते.

बॅप्टिस्टा यांना ‘Father of Homrule in India’ असे मानले जाते.

1916 चे लखनौ अधिवेशन: अध्यक्ष-बाबू अंबिकाचरण मुझूमदार

लखनौ करार – जहाल-मवाळ ऐक्य करार

1917 चे कोलकत्ता अधिवेशन – अध्यक्षा: डॉ. अँनी बेझंट (पहिल्या स्त्री अध्यक्षा)

कॉंग्रेस डेमोक्रटिक पार्टी 1920 च्या निवडणुका लढवण्यासाठी टिळकानी कॉंग्रेसआंतर्गत हा पक्ष स्थापन केला.

1 ऑक्टोबर 1920 – लो. टिळकांचे मुंबईत देहावसन

सर वालेंटाईन चिरोल यांनी लो. टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे संबोधतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us