आधुनिक भारताचा इतिहास | Modern Indian History Part IV

महात्मा गांधी 

  • जागतिक शांततेचे महान दूत
  • जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर गुजरात येथे.
  • 2 ऑक्टोबर हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो.
  • 1893-दक्षिण आफ्रिकेतील नाताळ येथे हिंदी मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आफ्रिकेस प्रयाण.
  • आफ्रिकेत असताना जॉन रस्कीनच्या अन टु धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजीवर प्रभाव पडला.
  • 25 मे 1915 ला त्यांनी साबरमतीच्या किनारी ‘सत्याग्रहाश्रम’ स्थापन केला.
  • गांधीजींनी रचनात्मक कार्यक्रम राबवताना ग्रामोद्योग संघ, बुनियादी शिक्षण संस्था, गोरक्षण संस्था यांची स्थापन केली.

चंपारण्य सत्याग्रह-1917

1916-च्या लखनौ अधिवेशनात राजकुमार शुक्ला या नीळ पिकावणार्‍या स्थानिक शेतकर्‍याने गांधीजींना आपल्यावरील अन्यायाबद्दल संगितले. 10 एप्रिल 1917 रोजी गांधीजींनी बिहारमधील चंपारण्यनजीक मोतीहारी येथे सत्याग्रह यशस्वी केला व ब्रिटिश मळ्यावाल्यांच्या जाचातून नीळ पिकावणार्‍या शेतकर्‍यांची सुटका केली.

खेडा सत्याग्रह-1918

1918 साली गुजरातमधील खेडा जिल्ह्यात मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकर्‍याच्या पुढाकाराने गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरू केली व सरकारकडून शेतसारा माफ करून घेतला.

जालियनवाला बाग हत्याकांड (13 एप्रिल 1919)

रौलेट कायद्याविरूद्ध पंजाबात जनमत प्रक्षुब्ध झाल्याने सरकारने डॉ. सैफुद्दीन किचलू, डॉ. सत्यपाल या प्रमुख नेत्यांना अटक केली. जनरल डायर या लष्करी अधिकार्‍याने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. 13 एप्रिल 1919 अमृतसरमधील जालियनवाला बागेत निषेध सभा भरली होती. या सभेतील जमावावर जनरल डायरने दारूगोळा संपेपर्यंत गोळीबार करण्याचा आदेश दिला. यावेळी झाडलेल्या सुमारे 400 फायरिंगमध्ये 400 लोक मृत्यूमुखी व 2 हजारांकडून अधिक जखमी झाले. रविंद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटीशांनी दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. या घटनेवेळी मायकेल ओडवायर हा पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. त्याने डायरला गोळीबाराचा आदेश दिला. 1940 साली सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये ओडवायरचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला.

हंटर कमिशन: जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या हंटर कमिशनने कोणतीही कारवाही केली नाही.

खिलाफत चळवळ (1919-1924)

तुर्कस्थानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्थान ब्रिटीशांच्या विरोधात जर्मनीच्या बाजूने लढल्याने ब्रिटीशांनी तुर्कस्थानवर निर्बंध लादले. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतातील मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली. नोव्हे. 1919 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते.

असहकार चळवळ-1920

1 ऑगस्ट 1920 रोजी असहकारच्या देशव्यापी आंदोलनास भारतभर प्रारंभ झाला. महात्मा गांधींनी ‘कैसर-ए-हिंद’ या पदवीचा, रविंद्रनाथ टागोरांनी ‘सर’ या पदवीचा तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘ICS’ या पदवीचा त्याग केला. 17 नोव्हेंबर 1921 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स भारतीय भेटीवर आले. तो दिवस निषेध दिन पाळण्यात आला. 1921 या एकाच वर्षात देशात 396 संप झाले. ‘टिळक स्वराज्य फंडा’साठी लोकांनी एक कोटीहून अधिक रक्कम जमा झाली.

चौरीचौरा प्रकरण व असहकार चळवळीचा शेवट

उत्तर प्रदेशातून गोरखपुर जिल्ह्यातील चौरीचौरा येथे 5 फेब्रुवारी 1922 रोजी शांततापूर्ण निदर्शने करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यावेळी संतप्त जमावाने लावलेल्या आगीत 21 कॉंस्टेबल व एक सबइन्स्पेक्टर असे 22 पोलीस मरण पावले. गांधीजींनी व्यथित होऊन 18 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलन तत्काळ थांबविण्याचा आदेश दिला. 10 मार्च 1922 गांधीजीवर राजद्रोहाचा आरोप ठेऊन 6 वर्षाची शिक्षा.

स्वराज पक्ष – 1923

गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्याने नाराज झालेल्या तरुण नेतृत्वाने कॉंग्रेसचा त्याग केला व 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज पक्षाची स्थापना करण्यात आली.

चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांचा पुढाकार

1923 च्या कायदेमंडळाच्या निवडणूकीत स्वराज पक्षाला 145 पैकी 45 जागांवर विजय मिळाला व कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष बनला.

1925 मध्ये सी. आर. दास यांच्या निधनाने स्वराज पक्ष क्षीण झाला व पुन्हा कॉंग्रेसमध्ये विलीन झाला.

सायमन कमिशन-1927: 1919 च्या मोंट-फोर्ड सुधारणा कायद्यात ‘दर दहा वर्षानी भारतीयांना राजकीय सुधारणांचा हप्ता दिला जाईल’ अशी तरतूद होती. त्यासंबंधी पाहणी करण्यासाठी सायमन कमिशन.

सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतीयांनी ‘सायमन परत जा’ (सायमन गो बॅक) असे नारे देत या कमिशनवर बहिष्कार टाकला.

लालाजींचा मृत्यू: नोव्हें. 1928 मध्ये लाहोर येथे सायमन कमिशनविरुद्ध निदर्शने करत असताना सोंडर्सने केलेल्या लाठीहल्यात पंजाब केसरी लाला लजपतराय हे वृद्ध नेते मरण पावले.

बार्डोली सत्याग्रह: 12 फेब्रु 1928 (बर्डोली हे बटर सिटी म्हणून ओळखले जाते.)

गुजरातमधील बार्डोली (जि. सूरत) परिसरात दुष्काळात सरकारने शेतकर्‍यांचा सारा 25 टक्यांनी वाढवला होता. यामुळे वल्लभभाई पटेल यांनी 1928 साली बार्डोली येथे सराबंदी चळवळ उभारून यशस्वी केली.

या घटनेमुळे जनता त्यांना ‘सरदार पटेल’ या नावाने ओळखू लागली.

(12 जून 1928 हा दिन सूरत येथे बार्डोली दिन म्हणून साजरा)

नेहरू रिपोर्ट 1928 ऑगस्ट

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेडन याने भारतीयांना स्वतःची घटना स्वतःच बनविण्याचे आव्हान केले. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आराखडा तयार केला.

नेहरू रीपोर्टमधील मागण्या:

भारताला साम्राज्याआंतर्गत वसाहतींचा दर्जा देण्यात यावा.

मुस्लिमांना राखीव जागा न मिळाल्याने बॅ. जिनाने नेहरू रीपोर्टास विरोध केला.

1928 चे कोलकाता अधिवेशन (43 वे)

1929 चे लाहोर अधिवेशन

31 डिसेंबर 1921 च्या मध्यरात्री रावी नदी किनारी जवाहरलाल नेहरू यांनी चरखांकित राष्ट्रीय ध्वज फडकविला. 2 जाने 1930 रोजी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत 26 जाने 1930 हा स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याची घोषणा करण्यात आली.

26 जाने 1930 रोजी तिरंगा फडकवून हजारो भारतीयांनी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली.

सविनय कायदेभंगाची चळवळ-1930

1929 च्या लाहोर अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्य’ हे राष्ट्रसभेचे ध्येय ठरवण्यात आले.

14 फेब्रु 1930 रोजी म. गांधीजींनी भारतीय जनतेस सविनय कायदेभंगाचा आदेश दिला.

दांडी यात्रा:

12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी 78 अनुयायांसह गुजरातमधील साबरमती आश्रमातून 385 Km वरील दांडी येथे प्रयाण केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडीयात्रेची तुलना ‘नेपोलियन एल्बवरुन पॅरिसकडे गेला’ या घटनेशी केली.

खुदा-ई-खिदमतगार: वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफारखान यांनी ‘खुदा-ई-खिदमतगार’ ही अहिंसक सत्याग्रहींची फौज निर्माण केली. खान अब्दुल गफारखान यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाते.

तीन गोलमेज परिषदा व गांधी आयर्विन करार: पुणे करार

सायमन कमिशनने आपला अहवाल 27 मे 1930 रोजी प्रसिद्ध केला. यातील शिफारशी नाकारण्यात आल्यामुळे त्यावर विचार करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा घेण्यात आल्या.

पहिली गोलमेज परिषद (10 नोव्हे 1930 ते 19 जाने 1931)

नोव्हें 1930 मध्ये ब्रिटनने तत्कालीन पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद लंडनमधील सुरू झाली. राजे पंचम जॉर्ज यांनी या परिषदेस उद्घाटन केले.

या सभेस 89 प्रतीनिधी हजर होते. (यापैकी 57 सरकारनियुक्त व 16 संस्थानांचे)

राष्ट्रीय सभेने यात भाग घेतला नाही.

राष्ट्रीय सभेच्या सहभागासाठी व्हाईसरॉय आयर्विन यांनी गांधीजींशी बोलणी सुरू केली.

(गांधी-आयर्विन करार: 5 मार्च 1931)

गांधीजींनी या करारानुसार पुढील तडजोडी मांडल्या.

  • कायदेभंगाच्या सत्याग्रहींची तुरुंगातून सुटका करणे.
  • समुद्राकाठाच्या लोकांना मीठ तयार करण्याची परवानगी द्यावी.
  • मिठावरील जाचक कर रद्द करावा.

या करारानुसार गांधीजींनी दुसर्‍या गोलमेज परिषदेस जाण्याचे मान्य केले.

दुसरी गोलमेज परिषद (7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931)

भारताला त्वरित संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गांधीजींनी केली.

संपूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळल्याने ते भारतात आले.

दुसर्‍या गोलमेज परिषदेवर व जातीय निवाड्यावर गांधीजींची टीका – ‘मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा.’

तिसरी गोलमेज परिषद (17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932)

या काळात येरवाडा तुरुंगातच गांधीजींनी ‘हरिजन सेवक संघाची’ स्थापना केली.

नोव्हें-डिसें 1932 या काळात भरलेल्या तिसर्‍या परिषदेस राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.

डॉ. आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिन्ही गोलमेज परिषदाना उपस्थित राहिले.

FAQ:

चंपारण्य सत्याग्रह कधी झाला?

1916-च्या लखनौ अधिवेशनात राजकुमार शुक्ला या नीळ पिकावणार्‍या स्थानिक शेतकर्‍याने गांधीजींना आपल्यावरील अन्यायाबद्दल संगितले. 10 एप्रिल 1917 रोजी गांधीजींनी बिहारमधील चंपारण्यनजीक मोतीहारी येथे सत्याग्रह यशस्वी केला व ब्रिटिश मळ्यावाल्यांच्या जाचातून नीळ पिकावणार्‍या शेतकर्‍यांची सुटका केली.

खेड सत्याग्रह कधी झाला?

1918 साली गुजरातमधील खेडा जिल्ह्यात मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकर्‍याच्या पुढाकाराने गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरू केली व सरकारकडून शेतसारा माफ करून घेतला.

स्वराज पक्षाची स्थापना कधी झाली?

गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्याने नाराज झालेल्या तरुण नेतृत्वाने कॉंग्रेसचा त्याग केला व 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज पक्षाची स्थापना करण्यात आली. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांचा पुढाकार होता.

तिसरी गोलमेज परिषद कधी झाली?

17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 ला तिसरी गोलमेज परिषद झाली.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us